0226118004 (माध्यमिक )

माजी विद्यार्थी

माजी विद्यार्थी

विदयालयाची यशोपताका फडकवणारे काही नामवंत माजी विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत.

1) सुप्रसिद्ध साहित्यिक कै. पु. ल. देशपांडे

महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. प्रवासवर्णन, नाट्यलेखन, संगीत, अभिनय अशा अनेक क्षेत्रांतील गुणग्राही कलावंत. तुझे आहे तुजपाशी, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, अपूर्वाई, पूर्वरंग या साहित्यकृतींना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार तर व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाला १९६६ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. भारत सरकारतर्फे १९६६ मध्ये पुलंना ‘पद्मश्री’ व १९९० मध्ये ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले.

2) श्री. प्रदीप नाईक – माजी हवाईदल प्रमुख

3) शेतकरी आंदोलनाचे नेते कै. शरद जोशी

महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते. १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना त्यांनी केली. ‘शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व त्यांनी केले. सप्टेंबर २००० ते जुलै २००१ या काळात भारत सरकारच्या कृषिविषयक कार्यबलचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २००४ ते २०१० या खासदारकीच्या काळात संसदेच्या १६ विविध समित्यांचे ते सदस्य होते. ‘अंगारमळा’ या पुस्तकासाठी सन २०१०चा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार व मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानचा सन २०११चा जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

4) क्रिकेटपटू श्री. अजित पै

सलामीवीर आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. अजित पै यांनी मुंबईसाठी रणजी करंडक स्पर्धेत १९६८-६९ च्या मोसमात पदार्पण केले. पहिल्या तीन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ११ बळी घेतल्यानंतर त्यांना दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी निवडले गेले. त्यांनी २५.८० च्या सरासरीने १२९ धावा व २३.२१ च्या सरासरीने २३ बळी टिपले.

5) शहीद ले. मकरंद घाणेकर – सैन्यदल अधिकारी

ले. मकरंद घाणेकर यांना देशासाठी लढताना दि. ०६ डिसेंबर १९७१ रोजी वीरगती प्राप्त झाली.

6) शहीद कॅ. विनायक गोरे – सैन्यदल अधिकारी

कॅ. विनायक गोरे यांना वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी दहशतवाद्यांच्या विरोधात कुपवाडा (जम्मू-काश्मीर) भागात ‘ऑपरेशन रक्षक’ मध्ये सहभागी असताना दि. २६ सप्टेंबर १९९५ रोजी वीरमरण प्राप्त झाले.

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow